बहुआयामी साहित्यिक आणि पत्रकार: विनोद पितळे

From Citypedia Thane
Revision as of 15:38, 8 March 2026 by Super Admin (talk | contribs)
(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)

बहुआयामी साहित्यिक आणि पत्रकार: विनोद पितळे

ठाणे शहराच्या सांस्कृतिक आणि साहित्यिक विश्वात ‘विनोद पितळे’ हे नाव अत्यंत आदराने घेतले जाते. गेल्या अडीच दशकांपासून साहित्य, पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रात त्यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. केवळ प्रसिद्धीच्या मागे न धावता, आपल्या कामाशी प्रामाणिक राहणारे व्यक्तिमत्त्व म्हणून ते ओळखले जातात.

​प्रभावी पत्रकारिता आणि विपुल लेखन

विनोद पितळे यांनी प्रहार, सकाळ, लोकमत आणि जनमुद्रा यांसारख्या प्रतिष्ठित दैनिकांमध्ये काम केले आहे. पत्रकारितेकडे केवळ 'बातम्यांचा व्यवसाय' म्हणून न पाहता, त्यांनी त्याकडे एक सामाजिक उत्तरदायित्व म्हणून पाहिले. सामाजिक प्रश्न, नागरी समस्या आणि सांस्कृतिक चळवळींवर त्यांनी प्रभावी लेखन केले. आजवर त्यांची २५ पुस्तके प्रकाशित झाली असून, ही सर्व पुस्तके विविध विषयांना स्पर्श करणारी आहेत. त्यांच्या लेखनात शब्दांचा नेमकपणा आणि वाचकांशी भावनिक नाते जोडण्याची ताकद दिसून येते.

संहिता लेखन आणि संपादन कौशल्य

केवळ बातमीदारीत न थांबता, संहिता लेखनातही त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आणि गणेेसोत्सवाच्या संहिता त्यांनी लिहिल्या आहेत. त्यांनी लिहिलेला ‘ज्ञानेश्वर ते नायगावकर’ हा कार्यक्रम विशेष गाजला. पात्रांचा मनोवैज्ञानिक अभ्यास आणि संवादातील ओघवतेपणा यामुळे त्यांच्या संहितांवर कलाकारांचा विश्वास असतो. याव्यतिरिक्त गौरव विशेषांकांचे संपादन आणि मानपत्रांचे लेखन यातही त्यांचा हातखंडा आहे. मानपत्र हे केवळ प्रशस्तीपत्र न राहता, तो त्या व्यक्तीचा जीवनपट वाटावा, इतके सुंदर शब्दंकन ते करतात.

सिने-गीतकार आणि सांस्कृतिक योगदान

विनोद पितळे यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणखी एक पैलू म्हणजे त्यांचे गीतलेखन. ‘शिष्यवृत्ती’ या चित्रपटासाठी त्यांनी गीतकार म्हणून काम केले आहे. शब्द, भाव आणि सूर यांचा सुरेख संगम त्यांच्या रचनांत दिसून येतो. सध्या ते 'ठाणे नगर वाचन मंदिराच्या' कार्यकारिणीत असून, वाचन संस्कृती वाढवण्यासाठी ते विशेष प्रयत्नशील आहेत.

साधे पण प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व

विनोद पितळे यांचे व्यक्तिमत्त्व शब्दांतकेच शांत आणि साधे आहे, पण त्यांचे विचार तितकेच प्रगल्भ आहेत. कवी, संपादक, अभ्यासू लेखक आणि संयोजक अशा विविध भूमिकांतून त्यांनी ठाण्याच्या सांस्कृतिक क्षेत्रात मोलाची भर घातली आहे. प्रसिद्धीसाठी नव्हे, तर कार्यासाठी आयुष्य वेचणारे विनोद पितळे हे आजच्या पिढीसाठी नक्कीच प्रेरणादायी आहेत.

संदर्भ: साप्ताहिक वृत्त प्रकाश, संपादक मनीष वाघ.